Menu Close

सद्गुणांचा विकास हे राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य ! – आनंद जाखोटिया

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘संस्कार पब्लिक स्कूल’मध्ये ‘राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावर प्रबोधन

श्री. आनंद जाखोटिया

भोपाळ (मध्यप्रदेश) – आयुष्यात सतत आनंदी रहाण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो; पण जेव्हा तणाव किंवा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण परिस्थितीकडे किंवा इतरांच्या वाईट वृत्तींकडे पहातो. त्यामुळे आपल्यातील वाईट वृत्ती दूर करण्यासाठी गुण वाढवण्याचा प्रयत्न केला, तर आपण आनंदी जीवन जगू शकतो. अशा प्रकारे स्वत:समवेतच विद्यार्थ्यांमध्येही सद्गुणांचा विकास करणे, हे राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. ते येथील संस्कार पब्लिक स्कूलमध्ये ‘तणावमुक्ती आणि राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकांचे योगदान’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते. या चर्चासत्राचा अनेक शिक्षकांनी लाभ घेतला. या वेळी शाळेचे सचिव वसंत चेल्लानी, कोषाध्यक्ष चंदर नागरदेव, उद्योगपती विष्णु बन्सल, सनातन संस्थेच्या सौ. संध्या आगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. जाखोटिया पुढे म्हणाले, ‘‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली अध्यात्माच्या विज्ञानात आहे. आपले यशही आपल्या मागील जन्माच्या कर्मावर अवलंबून असते. त्यामुळे आपले प्रयत्न आणि कुलदेवीचे नामस्मरण केल्याने आपली व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रगती होऊ शकते.’’ या वेळी चिनी उत्पादने आणि हलाल प्रमाणित उत्पादने यांवर बहिष्कार टाकून देशद्रोही अर्थव्यवस्थेला विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *