Menu Close

हिंदु मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावई यांची निर्घृण हत्या !

गोवंडी पोलिसांकडून धर्मांध वडील आणि भाऊ यांच्यासह चौघांना अटक

  • हिंदु मुलाशी लग्न केले म्हणून स्वतःच्या मुलीचा जीव घेणारे क्रूर धर्मांध !
  • धर्मनिरपेक्षतावादाचा टेंभा मिरवणारे याविषयी नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्पच रहातील ! -संपादक

मुंबई – मुलीने हिंदु मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिचे वडील रइसउद्दीन खान (वय ५० वर्षे) यांनी मुलगी आणि जावई यांची निर्घृण हत्या केली. गोवंडी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह तिचा भाऊ सलमान खान आणि अन्य दोघांना अटक केली आहे.

१. १४ ऑक्टोबरला देवनार गावातील टेलिकॉम फॅक्टरी परिसरात असलेल्या एका विहिरीत परिसरातील काही मुले पोहण्यासाठी गेली होती. या वेळी त्यांना एका तरुणाचा मृतदेह दिसला. पोलिसांना मृतदेह कह्यात घेतांना त्याच्यावर वार केल्याचे आढळले. मृत तरुणाचे नाव करण चंद्र (वय २२ वर्षे) असे होते. त्याने वर्षभरापूर्वी गुलनाज खान (वय २० वर्षे) हिच्यासमवेत प्रेमविवाह केला होता; पण तिच्या कुटुंबियांना तो मान्य नव्हता.

२. दोघांना जिवे मारण्याची योजना आखल्यावर वडिलांनी लग्नाला मान्यता देत असल्याचे खोटे सांगून मुलगी आणि जावई यांना घरी बोलावले. तेथे त्याच्यावर चाकूने आक्रमण करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकला. मुलीला कळंबोली परिसरातील निर्जन ठिकाणी नेत तिच्यावरही चाकूने आक्रमण केले. तिची ओळख पटू नये; म्हणून वडिलांनी तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *